शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी उपोषण बीड - शेतकऱ्यांना

 शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी उपोषण



बीड - शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण होते. बियाणे , खते खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शासनाने सरकारी बँकांना पिक कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही बँका जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पिक कर्ज देत नसल्यासमुळे भारतीय जनता पार्टी ऊमापुर सर्कल च्या वतीने उमापूर येथे शेतकऱ्यास पिक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. हे उपोषण सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांचे प्रश्न , समस्या सुटावी यासाठी कार्यसम्राट आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडवले. लवरकच सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावु असे भारतीय स्टेट बँकचे, मॅनेजर जाधव यांच्या ८ दिवसाच्या  लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. 

यावेळी उपोषणकर्ते रविराज आहेर , शंकर भैय्या औटी  , ज्ञानेश्वर खरात  , अंजीर पवार, किशोर आहेर , प्रविण आहेर , सुजीत देशमुख  यावेळी उपस्थित सरपंच महेश काका आहेर ,  देविदास काका खरात , आशोक तात्या वडघने, सचिन पवार ,हरीष वडघने ,बाळासाहेब पवार, अनिल जाधव , प्रसाद आहेर ,अजय चव्हाण, गणेश आहेर ,ऋषी मस्के , अंकुश विर ,महादेव कुरुदं ,रमेश साळवे  ,किशोर भोजने ,ऋषी देशमुख ,जगदीश दागंट ,सागर शेळके, वैभव घोडके ,प्रकाश कनसे ,कल्याण चेके, भागवत महानोर ,उध्दव घनवट व परीसराती असंख्य शेतकरी उपस्थित होते.