लॉक डाऊन मध्ये अडकलेल्याना एसटीने सोडणार
जाण्यासाठी फक्त फोनवरच होणार बुकिंग
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा घोषित करण्यात आला आहे. यावेळी तिसऱ्या टप्प्यात नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजूर व काही नागरिक, प्रवाशी त्यांच्या घरापर्यंत एसटीने सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी फोनवर बुकिंग करावी लागणार आहे माहिती मिळत आहे.
कोरोनामुळे पूर्ण जगावरच संकट कोसळले आहे. देशात महामारी सुरू आहे . या संकटात देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी कामगार, प्रवाशी, मजूर अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी काही विशेष गाड्यांनी त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. अशात नोकरी शिक्षण यामुळे शहरात अडकलेल्या लोकांना गावी जाता यावं यासाठी एसटीनं तिकीट बुकिंग सुरू केलं आहे.
एसटीनं आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. याद्वारे ऑनलाईन बुकिंग करून इच्छुक नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये हे नंबर सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
तर ग्रुप बुकिंगही केलं जाऊ शकतं. 44 रुपये प्रति किमी दरानं हा प्रवास असेल. म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास 250 रुपयात होऊ शकेल.
यामध्ये समजा जर मुंबई ते पुणे असं 200 किलोमीटर असेल तर 44 प्रति किमीने 200 किलोमीटरचे 8800 रुपये इतके होतील. एका बसमध्ये 45 किंवा 55 सीट्स असतील तर प्रत्येक सीटमागे साधारण 250 रुपये लागतील. विद्याविहार, मुंबई सेंट्रल, परळ, नेहरू नगर, पनवेल, उरण डेपोमध्ये तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता.
आगाराचे दूरध्वनी क्रमांक.
मुंबई आगार - 022 23072371
परळ आगार - 022 24304620
विद्याविहार - 022 25101182
नेहरू नगर- 022 25522072
पनवेल आगार - 022 - 27222466